Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्ट पासून

विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, दि. ११ :-   सन २०२२ चे पावसाळी अधिवेशन बुधवार दिनांक १७ ऑगस्ट पासून विधान भवन, मुंबई येथे होणार आहे. दिनांक १७ ते २५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज होणार असून विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

मुंबईत विधानभवन येथे विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, दादाजी भुसे, उदय सामंत, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानपरिषद व विधानसभा कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधानमंडळ सचिवालय प्रधान सचिव राजेंद्र भागवत आदी मान्यवर उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दिनांक १७ ते २५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत अधिवेशन होणार असून यामध्ये दिनांक २०,२१,२२ ऑगस्ट या सार्वजनिक सुट्या आहेत. दिनांक २४ ऑगस्ट रोजी विधिमंडळ कामकाजात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. याबैठकीत पावसाळी अधिवेशन विधानपरिषद व विधानसभा बैठकांची तात्पुरत्या दिनदर्शिकेवर चर्चा करण्यात आली.

 

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण;  सुर्यापल्ली वासीयांचा नवा उपक्रम

बंद कुलरमधील पाणी काढा डेग्यू आजारापासून बचाव करा.

 

Comments are closed.