Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या गोष्टी करायच्या अन् मातोश्रीवर भ्रष्टाचाराचे आरोप करतात

माझ्यावर लावलेल्या चौकश्यांचा आनंद - आदित्य ठाकरे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई प्रतिनिधी : मंत्र्यांना बंगले दिलेत, पण जिल्हे दिलेले नाहीत. पालकमंत्री आज गरजेचे आहेत; पण गद्दार सरकारचं लक्ष स्वतःवरच आहे जनतेवर नाही, अशी घणाघाती टीका शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी विधिमंडळात माध्यमांशी संवाद साधताना केली. यावेळी त्यांनी त्यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांच्या चौकशीवर भाष्य करताना दिलखुलासपणे चौकशी करा आनंद आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

हे सरकार स्थापन झालं तेव्हा दोन जण मंत्री झाले. मंत्री ठरवायला ४२ दिवस लागले. पण जिल्ह्यांचे पालकमंत्री ठरलेले नाही. खोके ओके हे काही झोमण्यासारखं नाही. मुख्यमंत्र्यांची भाषा योग्य नाही. या आमदावर कुणाचा अंकुश नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

विभागाच्या पुनर्रचनेत कुणीही पाठिंबा दिला तरी चालेल कधीही निवडणुका घ्या आम्ही सामोरे जाण्यास तयार आहोत. आधी नियुक्ती केली जाते मग थांबवली जाते. हे सरकार फक्त स्वार्थासाठी सुरू आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

अन् मातोश्रीवर भ्रष्टाचाराचे आरोप करतात

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या गोष्टी करायच्या दुसरीकडे मातोश्रीवर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे. ज्या बाळासाहेबांच्या मुलाने सर्व काही दिलं त्याच्या पाठित खंजीर खुपसायचा. त्यामुळे यांच्यासाठी ‘गद्दार’हा शब्दच योग्य आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

हे देखील वाचा : 

Comments are closed.