Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

हवामान खात्याकडून पावसाचा इशारा.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, ३०, ऑगस्ट :- राज्यात पावसाळा सुरू झाल्यापासून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यभर मुसळधार पाऊस झाला. अनेक जिल्ह्यांमध्ये धुवाधार पावसाने हजेरी लावल्यामुळे नदी-नाले तुडुंब भरल्याचं चित्र आहे. अनेक भागांमध्ये पूर परिस्थितीही ओढावल्याचं चित्र आहे. अशात आता हवामान खात्याकडून पुन्हा महत्त्वाच्या शहरांना पावसाचा इशारा दिला आहे.
श्री गणेशांच्या आगमनालाच पावसाने हजेरी लावली आहे. ऐन गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर पुणे शहरासहित कोल्हापूर, सांगली भागात पावसाचे जोरदार बँक कमिंग होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.
हवामान खात्याने काही जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा दिला असून नागरिकांनी काळजी घ्यावी आणि प्रशासनास सहकार्य करावे. असे कळविले आहे.

हे देखील वाचा :-

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

लोहखनिजाच्या वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या सोडवा अन्यथा चक्काजाम आलापल्ली व्यापारी संघटनेचा ईशारा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मेट्रो प्रकल्प पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करणारा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Comments are closed.