Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नैना – तीसरी मुंबई म्हणून ओळख मुंबईतील लोकांचा राहण्याचा दर्जा वाढविणार ….

पुढील तीन महिन्यात धारावीच्या पुनर्विकासास सुरूवात - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई, दि. 30 सप्टेंबर : धारावी प्रकल्प हा शहरी भागातील सर्वांत मोठा प्रकल्प असून या प्रकल्पामुळे संपूर्ण मुंबईचा चेहरामोहरा बदलणार आहे. आता पुढील तीन ते चार महिन्यात धारावीच्या पुनर्विकासास सुरूवात केली जाईल. यासंदर्भात सर्व मजुंरी आणि निविदांची कामे लवकरच मार्गी लागेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

मुंबईतील जिओ कॅन्वेक्शन सेंटर येथे नरेड्को महाराष्ट्र होमेथॉन एक्पो 2022 चे उद्घाटन उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नरेड्कोचे राष्ट्रीय अध्यक्ष राजन बांदेलकर, नरेड्को महाराष्ट्रचे अध्यक्ष संदीप रूनवाल, नरेड्को महाराष्ट्रचे सचिव अभय चांडक आणि नाईट फ्रँकचे व्यवस्थापकीय संचालक तथा अध्यक्ष शिशिर बैजल उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मुंबईतील वाहतुकीसंदर्भातील सर्व पायाभूत सुविधा पूर्णत्वाकडे जात असून मुंबईच्या विकासाकरिता विकासकांच्या नवनवीन कल्पनांची आवश्यकता भासणार आहे. वित्तीय संस्था शासनाबरोबर काम करायला उत्सुक आहेत. यामुळे याचा फायदा मुंबईतील नागरिकांना होणार आहे. आपल्याला मुंबई ही राहण्याजोगी करण्याबरोबरच मुंबईतील लोकांच्या राहण्याचा दर्जाही वाढवायचा आहे. आम्ही सर्वप्रथम महारेरा कायदा आला आणि तो यशस्वी झाला. महारेराने उद्योगांसाठी विश्वासाहर्ता आणली असल्याचे श्री.फडणवीस यांनी सांगितले.

मुंबईतील म्हाडा आणि एसआरएच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गृहनिर्माणाची प्रकल्प हाती घेण्यात येत आहे. मुंबई हे आय-लॅण्ड शहर असून एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यासाठी कमीत कमी वेळ लागावा, यासाठी मेट्रो, ट्रॉन्सहॉर्बर लिक, कोस्टल् रोड यासारखे प्रकल्प हाती घेण्यात आले असून ते आता पुढील वर्षाच्या शेवटी पूर्णत्वाकडे जाणार आहेत. नवी मुंबईतील विमानतळ जवळ नैना हा प्रकल्प हाती घेण्यात आला असून नैनाची तीसरी मुंबई म्हणून ओळख असणार आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

श्री.फडणवीस म्हणाले की, बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या विकासक, गुंतवणुकदारांना शासनाकडून काही सवलती देण्यासंदर्भात आवश्यक ती पाऊले उचलली जातील. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून यासंदर्भात लवकरच चांगला निर्णय घेऊ, असे आश्वासन यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नरेड्कोला दिले.

या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या हस्ते नाईट फ्रँक आणि नरेड्को यांच्या संयुक्त अहवालाचे तसेच ओपन एकर्स या मासिकाच्या मुखपृष्ठाचे विमोचन करण्यात आले.

हे देखील वाचा : 

धक्कादायक! सावत्र आईच्या मारहाणीत साडे तीन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

धक्कादायक! दोन चिमुकल्यांसह आईची विहीरीत उडी मारुन आत्महत्या

 

 

Comments are closed.