Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अखेर अमरावती मनपा, पोलीस प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

अमरावती, दि. १६ जानेवारी :  राजमाता जिजाऊ यांच्या जयंती दिनी युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आमदार रवी राणा यांनी बीना परवानगीने शहरातील राजापेठ येथील उड्डाण पुलावर शिवाजी महाराज यांचा अष्टधातुचा बसवलेला पुतळा आज पहाटे प्रचंड पोलिस बंदोबस्तात हटवण्यात आला. काल मध्यरात्री राजापेठ उड्डाण पुलाचे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते नंतर हा पुतळा महानगरपालिका व पोलीस प्रशासना द्वारा काढण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवू नये अशी मागणी युवा स्वाभिमान पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली होती. या पुतळ्यावरून आता राजकारण चांगलेच तापले असून आ. रवी राणा व खासदार नवनीत राणा यांच्या घरासमोर पोलिस व SRPf चा मोठा बंदोबस्त लावून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अमरावती महापालिकेत भाजपची सत्ता आहे. या पुतळ्याला महापालिकेने परवानगी द्यावी अशी मागणी आमदार रवी राणा यांनी दोन दिवसापूर्वी महापालिकेत केली होती, पुतळ्यावरून जिल्ह्यात राजकारण चांगलेच तापले असून कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी राणा दाम्पत्यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवले आहे. 

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सशस्त्र सीमा बलाचे सुपुत्र जवान अमोल पाटील यांना नेपाळ सीमेवर वीरमरण

धक्कादायक! सिलिंडरच्या स्फोटात बाप-लेकाचा जागीच मृत्यू…

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थविरोधी जनजागृती; 34 पान टप-यांवर करण्यात आली कारवाई

 

 

Comments are closed.