Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

फुटपाथ धारकांच्या मोर्चाला पाहून मुख्याधिकारी ‘पळाले’

अतिक्रमण हटाव कारवाई विरोधात शेतकरी कामगार पक्षाने काढला मोर्चा.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. १६ फेब्रुवारी : गडचिरोली हा उद्योग विरहित जिल्हा असून पोटभरण्याच्या उद्देशाने खेड्यातील गरीब लोकांनी गडचिरोली शहरात फुटपाथवर दुकाने सुरू केलेली आहेत. ही फुटपाथ दुकाने अत्यंत बळजबरीने आणि एकतर्फी, द्वेषभावनेतून करण्यात येत असून पर्यायी व्यवस्था होईपर्यंत सदर कारवाई थांबविण्यात यावी यासाठी शेतकरी कामगार पक्षातर्फे नगर परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा येणार असल्याची माहिती असल्याने मोर्चेकऱ्यांना सामोरे न जाता मुख्याधिकारी विशाल वाघ बैठकीचे नावाने गायब होते.

शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, जयश्री वेळदा, शामसुंदर उराडे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, मिलींद बांबोडे, विवेकराजे बारसिंगे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा गांधी चौक ते नगर परिषद दरम्यान काढण्यात आला होता.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

काल सकाळपासून अचानकपणे राष्ट्रीय महामार्ग विभाग, नगर परिषद आणि पोलिस विभागाने संयुक्त कारवाई करीत अतिक्रमण हटाव मोहिम सुरू केली. रस्त्याच्या कामासाठी अतिक्रमण हटाविणे क्रमप्राप्त असले तरी महामार्ग विभागाच्या नियमापलीकडे जावून बळजबरीने आणि द्वेषपूर्ण भावनेने सदर कारवाई नगर परिषदेने केलेली आहे.सदर कारवाई मुळे गरीब लोकांसाठी एक आणि शहरातील मोक्याच्या जागा बळकवणाऱ्या श्रीमंतांना एक असे वेगवेगळे नियम आणि कायदे असल्याचे प्रशासनाने दाखवून दिले आहे. हा प्रकार अत्यंत निंदनीय असून कोरोनाने आधीच हतबल फुटपाथ दुकानदारांना उपासमारीच्या खाईत लोटणारा आहे. असा आरोप यावेळी भाई रामदास जराते यांनी केला.

प्रशासनाच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या नियमापलीकडे जावून केली जाणारी नगरपालिका, गडचिरोली ची कारवाई तातडीने थांबविण्यात यावी. सदरची कारवाई न थांबविल्याने नगर परिषद गडचिरोलीच्या कार्यालयावर १६ फेब्रुवारी रोजी अन्यायग्रस्त फुटपाथ दुकानदारांना न्याय मिळवून देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नगर परिषद, गडचिरोली ने कारगील चौकात बांधलेले १०० दुकानगाळे शहरातील फुटपाथ धारकांना ‘ड्रा’ पध्दतीने देण्यात यावेत. यात १०% गाळे नक्षलपिढित कुटुंबीय फुटपाथ धारकांना देण्यात यावेत. गडचिरोली जिल्ह्यात कोणताही मोठा उद्योग नसल्याने शहरातील अतिक्रमण धारक फुटपाथ धारकांना पर्यायी जागेची व्यवस्था करुन उपजिविकेची हमी देण्यात यावी. गडचिरोली शहरातील चारही प्रमुख महामार्गावर सर्वीस रोड तयार करण्यात यावा. या प्रमुख मागण्यांसाठी नगर परिषदेवर हा मोर्चा काढला होता.

या मोर्चात शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते चंद्रकांत भोयर, देवेंद्र चिमनकर, प्रहार जनशक्तीचे निखिल धार्मिक, मंगेश पोरटे, प्रभाकर शेंडे,संदिप निशाणे, उमाकांत लांजेवार, भाऊराव भगत, विजय शेंडे, सलमान खान, उमेश वैरागडे, हुसेन शेख, लालू कोवासे, अनिल मट्टामी, गणेश हिचामी, हितेश करकाडे, शिवराम हिडामी, रामलाल मट्टामी, एकनाथ उंदिरवाडे, रुमाजी कुनघाडकर, लंकेश्वर खोब्रागडे, रविंद्र सोनटक्के, दाविन गडकरी, मोरुभाऊ रामटेके यांचेसह शेकडो फुटपाथ धारक उपस्थित होते.

हे देखील वाचा : 

राजनगरीत अतिक्रमण हटाव मोहीम; नगर पंचायत ची निवडणूकी नंतर मोठी कार्यवाही

पाच वर्षीय चिमुकलीचा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद

वनाधारीत शाश्वत विकासासाठी जिल्हा प्रशासन आणि ग्रामसभांमध्ये होणार सामंजस्य करार

 

Comments are closed.