Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे दूध वाटप करून जालन्यात शेतकरी आंदोलनाला सुरुवात.

विजय साळी (जालना), लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

जालना, दि. ८ डिसेंबर : केंद्र सरकारने शेतकर्‍याविरूद्ध तीन काळे कायदे केले आहेत. हे कायदे मागे घेण्यासाठी गेल्या अनेक महिण्यापासून सातत्याने आंदोलने उभारली गेली. परंतू केंद्र सरकारने कोणतेच पाऊल उचलले नाही. परिणामी देशातील शेतकर्‍यांनी दिल्ली येथे या काळ्या कायद्याविरोधात देशव्यापी आंदोलन पुकारले आहेत. दि. 8 डिसेंबर मंगळवार रोजी सर्व पक्षाच्या वतीने भारत बंदची हाक देण्यात आलेली आहे. शेतकरी, कष्टकरी आणि कामगारांना न्यायहक्क मिळवून देण्यासाठी जनता या बंदमध्ये उतरली आहे.

शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देत अतिशय शांततेच्या मार्गाने जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलंय. या अंतर्गत शेतीमाल, दुधाचं नुकसान न करता गोरगरीब, गरजू बालकांना दुधाचे वाटप करण्यात आले. लोकांच्या भुकेसाठी अन्न उत्पादित करणारा शेतकरी राबराब राबतो, नैसर्गिक संकटांचा सामना करत हा शेतकरी मेटाकुटीला आला असला तरी शेतीमालाचे नुकसान न करता तो या आंदोलनात उतरला असल्याचे या आंदोलनातून दिसून आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दिल्ली येथील सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दूध वाटप करून या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे बाळगोपाळांना तसेच ग्रामस्थांना दूध वाटप करून या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली आहे.

सुरेश काळे, शेतकरी संघटना नेते

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

दिल्लीतील शेतकरी आंदोलन हे अत्यंत शांततेने सुरू आहे. या आंदोलनास महाराष्ट्रातूनही शांततेत सहभागी होण्याचे आव्हान राजू शेट्टी यांनी केले होते. त्यामुळे या आंदोलना कुठलाही गालबोट न लावता, कुठे ही अनुचित प्रकार न करता शांततेत दिवसभर बंद पाळण्यात येत आहे. उत्तर भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आज महाराष्ट्र बंदची हाक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली आहे,शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या या आंदोलनात कुठेही गालबोट न लावता शांततेत हे आंदोलन यशस्वी करायचे त्यासाठी कुठलीही नासाडी न करता आज नागरिक आणि लहान मुलांना दूध वाटप करून जालना जिल्ह्याच्या वतीने या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी शेतकरी संघटनेचे सुरेश काळे यांनी दिली.

लग्न करा शुभ मुहूर्तावर.

Comments are closed.