Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कारचा भयंकर अपघात; पुण्यातील एकाच कुटुंबातील तीन जण ठार

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघरच्या मेंढवन घाटातील घटना ..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्

मनोज सातवी,

पालघर, 23 नोव्हेंबर : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघरच्या मेंढवन घाटात कारचा अपघात झाला असून या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी आहेत यामध्ये एका ५ वर्षांच्या मुलीचा समावेश आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

प्राप्त माहितीनुसार, मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी मुंबईकडून गुजरातकडे भरधाव जाणाऱ्या कार वरील चालकाचा ताबा सुटल्याने पालघरच्या मेंढवन घाटात कारचा भीषण झाला. मेंढवन घाटातील धोकादायक वळणावर हा अपघात इतका भीषण होता की,  ही कार विरुद्ध दिशेला जाऊन समोरून येणाऱ्या टँकरवर जाऊन धडकली .त्यामुळे कार यामध्ये कारचा चुराडा झाला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या अपघातात तिन जणांचा जागीचमृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी आहेत. हर्षद गोडबोले (वय 42), आनंदी गोडबोले (वय 5) आणि वाहन चालक मिलिंद वैद (वय 43) अशी मृतांची नाव आहे. तर हर्षदा गोडबोले (वय 37), अद्वैत गोडबोले ( वय 12) अशी जखमींची नाव आहे. मयत तिन्ही पुणे येथील रहिवाशी असल्याची माहिती समोर आली आहे.

जखमींवर सध्या कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. या अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली असून पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. याच धोकादायक वळणावर आजपर्यंत अनेक अपघात झाले असून हा महामार्ग तयार झाल्यापासून याच ठिकाणी आतापर्यंत या ठिकाणी शेकडो जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तरी देखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण धोकादायक वळणावर कोणत्याही उपाययोजना करत नसल्याचे दिसून येत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

हे देखील वाचा ,

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा संपन्न

ग्रामपंचायत निवडणुकांतील उमेदवारांनी तीस दिवसांत ट्रू व्होटर ॲपद्वारे निवडणूक खर्च सादर करणे आवश्यक

अकोला- अमरावती महामार्ग निर्मितीचा गिनीज विश्व विक्रम भारतमातेच्या चरणांशी समर्पित – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Comments are closed.