Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वाघ-मानव संघर्षाचा आलेख वाढतच आहे चंद्रपूरात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

जागतिक व्याघ्र दिवस विशेष

चंद्रपूर, दि. २९ जुलै : चंद्रपूर जिल्ह्यात २०१४ या वर्षात १११ वाघ होते. त्यानंतर त्यांची संख्या वाढून २०२० मध्ये संख्या २४६ + झाली असून ती आता २०२१ च्या अंदाजानुसार ३०० पर्यंत वाघांची संख्या असल्याचे भाकीत वर्तविण्यात आले आहे. सध्या जंगलाच्या अवतीभोवती गावे आणि त्या गावातील गावकऱ्याचा वाढता हस्तक्षेप जंगलात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

लॉंकडाऊन काळात रोजगार अभावी कठीण परिस्थिती निर्माण झाल्याने हलाकीची परिस्थिती निर्माण झाली आहे. मनुष्य पोटाची खडगी भरण्यासाठी अवैधरीत्या जंगलाचे वृक्षतोड करण्यासाठी अतिक्रमण करतांना दिसन आहे. गरिबी, रोजगारीचा अभाव जंगलतोड, विकासकामे आणि राजकीय हस्तक्षेपामुळे वन्यजीव-मानव संघर्षात वाढ होत असून मानवावरील हल्यात आणि मृत्यूत सतत वाढ होतांना दिसत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

२००६ पासून सुरु झालेला वाघ मानव संघर्ष वर्षागणिक वाढतच असून त्यामुळे गेल्या सात वर्षात चंद्रपूर जिल्ह्यात २६ वाघ आणि १२२ मानवी मृत्यू झालेले आहेत.२००६ मध्ये केवळ ९ संघर्षाच्या घटना घडल्या होत्या त्या वाढून २०१८ मध्ये  ९१७ पर्यंत वाढल्या आहेत, ह्यातील  सर्वाधिक ५५ % घटना ब्रम्हपुरी,२५ % चंद्रपूर आणि २० % घटना सेन्ट्रल चांदा विभागात घडल्या आहेत. वन्यजीव आणि मानव दोधांचेही प्राण वाचवायचे असेल तर वन् विभाग, ग्रामीण नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि राजकीय पुढारी ह्यांनी एकत्र येवूनच ह्या समस्येवर मात करता येइल.

हमखास व्याघ्र दर्शन देणारा ताडोबा व्याघ्र प्रकल्प जगप्रसिद्ध असून पर्यटक वाघ पाहण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणावर येतात. उत्तम अधिवास आणि वन्यजीव क्षेत्रात संरक्षणामुळे वाघ व वन्यजीवांची संख्या वाढत आहे तर दुसरीकडे वाढती लोकसंख्या, विकास, रोजगारीचा अभाव ह्यामुळे ग्रामीण लोकांची जंगलावरील अवलंबिता वाढली आहे.

जवळ-जवळ ८०० गाव जंगलात किंवा परिसरात आहेत, त्यामुळे वाढत्या वाघ-वन्यजीवांचा त्रास शेतकरी आणी नागरीकांना होतो आहे. तशीच समस्या वन्यजिवाची  सुद्धा आहे. जिल्ह्यात वेकोली च्या खाणी आणि अनेक उद्योग आहेत. त्यामुळे वाघ वन्यजीवांचे अधिवास, भ्रमणमार्ग बाधित झाले असल्यामुळे वन्यजीव-वाघ-मानव संघर्षात वाढ झाली आहे. केवळ चंद्रपूर शहराजवळ २१ वाघ आहेत, चंद्रपूर प्रादेशिक जंगलात ३० पिलांच्या वाघीन, ३७ बछडे आणि ४१ लहान वयस्क वाघ आहेत. ह्यावरून वाघांच्या संख्येत किती वाढ झाली हे लक्षात येते. वाघांच्या वाढीमुळेच  ताडोबातील वाघ विविध मार्गे महाराष्ट्रभर जात आहे. त्यातूनही त्या ठिकाणी वाघ-मानव संघर्ष उद्भभवत आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांची अधिकृत संख्या-चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या दशकात वाघांची संख्या वाढली आहे. ती पुन्हा वाढतच आहे. ह्या वर्षाअखेर ही संख्या ३०० च्या जवळ असेल असे वनविभागाचे मत आहे. ही  संख्या सुद्धा वाघ-मानव संघर्ष वाढण्यास कारणीभूत आहे. ताडोबा आणि प्रादेशिक मिळून वाघांची संख्या २०१४ मध्ये १११ होती, २०१५ – १२१, २०१६ -१२८ , २०१७ – १५२ ,२०१८ – १६० ,२०१९ – २२१, २०२०-२४६ इतकी प्रचंड वाढली. पूर्वी ताडोबातील वाघांची संख्या प्रादेशिक पेक्षा जास्त असायची परंतु २०१७ च्या पुढे यात बदल झाला असून प्रादेशिक जंगलातील वाघांची संख्या ताडोबापेक्षा वाढली.

२०१७ मध्ये ताडोबात ७५ वाघ तर प्रादेशिक मध्ये ७७ वाघ होते. २०१९ मध्ये ताडोबात १०६ तर प्रादेशिक मध्ये ११५ वाघ, २०२० मध्ये ताडोबात १०६ वाघ तर प्रादेशिक मध्ये १४० वाघ आढळले. ह्या आकडेवारी वरून संरक्षित जंगलापेक्षा असंरक्षित जंगलात वाघांची संख्या वाढत आहे. जंगलात, शेतात, कोळसा खाणीत, थर्मल पॉवर स्टेशन, औद्योगिक आणि ग्रामीण भागात सुद्धा वाघांनी आपले तात्पुरते अधिवास बनविलेले आहे.

वाघ-मानव संघर्शात मानवी मृत्य वाढत आहेत – २०१४ मध्ये ताडोबा, प्रादेशिक आणि इतर जंगलात वाघ आणि इतर हिंस्र प्राण्यांच्या हमल्यात  ९ लोकांचा मृत्यू झाला होता. २०१५ मध्ये ८ ,२०१६ मध्ये १७,२०१७ मध्ये १७,२०१८ मध्ये २७,२०१९ मध्ये २५,२०२० मध्ये ३३ आणि २०२१ मध्ये आतापर्यंत ३१ लोकांचा वन्यजीवांमुळे मृत्यू झाला आहे.

२०१४ ते २०२१ दरम्यान १६७ लोक मृत्युमुखी पडले असून यात वाघांमुळे १२२ तर इतर प्राण्यांमुळे ४५ गावकऱ्यांंचा मृत्यू झाला आहे. व्याघ्र प्रकल्पात ३५ आणि प्रादेशिक मध्ये १३२ लोकांचा मृत्यू झाला होता. हा आलेख पाहता दरवर्षी मानवी मृत्यूत वाढ होतांंना दिसत आहेत. या वर्षीचे वैशिष्ट म्हणजे उन्हाळ्यात होणारा हा संघर्ष आता जून-जुलै महिन्यात सुद्धा घडतो आहे. यात मृत्युमुखी पडनाऱ्यात गुराख्यांचा समावेश जास्त आहे.

वाघ-मानव संघर्षात वाघांचा मृत्यू- २०१४ ते २०२१ ह्या सात वर्षात नैसर्गिक, अपघात आणि शिकार अश्या घटनात एकूण ६४ वाघांचा मृत्यू झालां असून नैसर्गिक कारणामुळे ३८ वाघ, अपघातात ११ वाघ, आणि शिकारीत १५ वाघांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनात येते.

या घटना पाहता २०१९ आणि २०२० या दोन वर्षात शिकारीमुळे १० वाघांचा मृत्यू झाला. ही घटना या संघर्षाचे वाढते स्वरूप विषद करते. हा संघर्ष कमी करण्यासाठी २६ जुलै रोजी नागपूर येथील अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव  यांनी जिल्ह्यातील सर्व वनाधिकारी आणि तज्ञांची वेबिणार द्वारा बैठक घेतली आणि सुचना मागविल्या.

हा संघर्ष कमी करण्यासाठी उपाय योजना-वाढते वाघ-बिबट-अस्वल आणि वन्यजीवांची संख्या, हल्यात मानवी मृत्यू, शेतीचे नुकसान, जंगलतोड आणि मानवाचा  जंगलातील हस्तक्षेपामुळे वाघ-मानव संघर्ष वाढतो आहे. वाघ, वन्यजीव आणि मानव यांचे अस्तित्व महत्वाचे असुन त्यांच्यात सहजीवन साधता येईल काय यावर चिंतन झाले पाहिजे.

यासाठी दीर्घकालीन आणि लघु कालीन उपाय योजना करणे अत्यावश्यक आहे. वन जमिनीवर आणि वाघांच्या भ्रमन मार्गात वनीकरण, गवताळ प्रदेश वाढविणे, जलसाठे तयार करणे, गावाजवळ मोह, फळझाडे आणि तेंदू झाडांची लागवड करणे, गावे आणि शेतीसाठी सोलार कुंपण, गावांची जंगलावरील अवलंबिता कमी करणे, ग्रामीण भागाचा वीकास करणे, जंगलातील रस्त्यांना आतून वन्यजीव मार्ग देणे, वनशेतीला चालना देणे आणि वाघ-मानव संघर्षासाठी स्वतंत्र सेल स्थापण करणे इत्यादी अनेक स्थायी उपाय योजना आवश्यक आहेत.

याचसोबत लघुकालीन उपाय योजना जसे हल्ले करणाऱ्या आणि अगदी गावाजवळ असलेल्या वाघ, बिबट, अस्वल ह्यांना त्वरित पकडण्याची परवानगी मिळणे आणि योग्य अभयारण्यात सोडणे, लोकांना जंगलात जाण्यापासून परावृत्त करणे, जंगलात चराईवर नियंत्रण, वन विभागाचे नियमित निरिक्षन ठेवणे, स्थानिक नेते आनि गावकऱ्याचे संवर्धनासाठी मन वळविणे, जिल्हा परिषद आणि वन विभागातर्फे ग्रामीण भागात गरिबी दूर करणे इ. अनेक विकासाच्या विविध योजना राबविणे अशा अनेक उपाय योजना राबविल्यास वाघ-मानव संघर्ष निश्चित कमी करता येईल.

हे देखील वाचा  :

चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पावसात खेळणा-या वाघ बछड्यांचे व्हिडिओ वायरल

अबब! १२ फुटाची महाकाय मगर पकडली सांगलीवाडीत

नक्षल्यांनी बॅनर बांधून पैड़ी चकमकीत ठार झालेल्या नक्षल्यांना वाहीली श्रद्धांजली

 

Comments are closed.